EXPERIENCE LA-GRANDE BY HEMANT BORSE

THIS IS MY DAY TO DAY JOURNEY THESE ARE MY WORDS FOR MY WORK

पु.लं. चे किस्से
Friday, June 13, 2008
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले। योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

**************************************************************************************

माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखतवाचली। त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्नठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरचघाव घातला' .
*******************?************************************************************

वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र। एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,"हा मझा मित्र शरद तळवलकर""हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,हा चांगलाच असरणार!""हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं."अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावातएकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
*************************************************************************************


पु।लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचाआवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडेभडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरामोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाजखाली येतो की नाही बघ."
*****************************************************************************************


पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे। ते पंधरार्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यानहोत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^


एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली।बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले। "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले."तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"


************************************************************************************
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात।'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलंह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

****************************************************************************************

माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका।एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु।लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>
posted by Hemant Narendra Borse @ 8:29 AM

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home